Thursday, July 25, 2013

19. मोदींचा व्हिसा आणि भारतीय लोकांची मनोवृत्ती! (modi_visa)

पासष्ठ खासदारांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलंय म्हणे! मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नका म्हणून.. बातमी वाचून पोट दुखेपर्यंत हसलो.. पत्र लिहिण्याच कारण काहीही असो पण टिपिकल (हा शब्द वापरण्याचा मोह आवरला नाही) भारतीय मनोवृत्ती ह्यातून दिसून आली.. कोणत्याही गोष्टीवर पाश्चिमात्त्य देशाचा (किंबहुना मुख्यतः अमेरिकेचा) पसंतीचा शिक्का बसला कि ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट शिरोधार्य! अमेरिकेने एखादी गोष्ट मान्य केली कि ती उत्तम किंवा तिचं महत्त्व लोकांना पटतं! बिल गेट्स भारतात येऊन गरीबांना भेटून गेला कि वृत्तपत्रांमधून भारतातील गरिबी, ती हटवण्याचे उपाय ह्यावर चर्चा सुरु होते, अग्रलेख छापून येतात! मुंबईच्या डबेवाल्यांना इंग्लंड मधून बोलावणं आला कि मग लोकांना जाग येते कि ते म्यानेजमेंट गुरु आहेत म्हणून! एखाद्या TED Talk show  मध्ये कोणी सांगितलं कि "Do meditation every day. It helps you to be healthy and happy." कि मग सगळ्यांना त्याच महत्त्व पटणार. पण तेच आपल्या पूर्वजांनी सांगितलय कि रोज देवघरात बसून ध्यानधारणा करा किंवा संध्याकाळी तुळशीसमोर बसून शुभंकरोती म्हणा कि लगेच सगळेजण त्याची मूर्खपणा किंवा अंधश्रद्धा असं म्हणून हेटाळणी करणार! आनंद कर्व्यांना अश्डेन पुरस्कार मिळेपर्यंत कोणाला त्यांच्या संस्थेबद्दल किंवा कामाबद्दल काहीच माहिती नव्हती.. अर्थात आताही खूप जणांना त्याबद्दल माहिती आहे असं नाही.. आज आपल्या इथे असे अनेक लोक आहेत कि जे काहीतरी विधायक करताहेत.. समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी करताहेत.. फारसं कोणी त्यांची दखल घेताना दिसत नाही.. आपली (म्हणजे सुशिक्षित लोकांची) मनोवृत्ती म्हणजे पाश्चिमात्त्य देशातून एखाद्या गोष्टीची दखल घेतली गेली, कि त्यावर भयंकर चर्चा करायची, त्या गोष्टीशी निगडीत व्यक्तीला एकतर डोक्यावर तरी घ्यायचं किंवा पार खाली पाडायचं आणि नव्याचे नऊ दिवस संपले कि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! शोधा नवीन काहीतरी मुद्दा, करा चर्चा, लिहा अग्रलेख!! राजकारणी आणि समाजातले तथाकथित विचारवंत/पुढारी हे केवळ स्वतःच्या सोयीप्रमाणे वागतात.. 

राहता राहिला मोदींच्या व्हिसा चा मुद्दा! निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार आहे हा.. हि लोकं पत्र लिहिणार, आणि तो ओबामा काय वाचणार आहे होय? बातमी ऐकून हसला असेल तो.. मला सांगा, अमेरिकेने मोदिंना व्हिसा नाकारला म्हणजे नक्की काय सिद्ध होतं? अमेरिकेला काही घेणं देणं नाहीये कोणी काय केलय त्याच्याशी.. तुम्ही दंगल करा नाहीतर भ्रष्टाचार करा.. त्यांना ज्याला व्हिसा द्यायचा आहे त्याला ते देणार.. आणि ज्याला नाहीये द्यायचा त्याला ते नाही देणार.. आणि ह्या लोकांना पत्र लिहिण्याची एवढीच हौस आहे तर म्हणव मनमोहनसिहांना लिहा कि पत्र.. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कडक पावलं उचला म्हणून..!!

असो.. लिहिण्यासारखं बरच काही आहे.. पण शेवटी हे अरण्यरुदनच!

2 comments:

  1. khara ahe! tasahi visa process tar India madhye ch hote.. Tithale loka ch tharawatata! ekmekanche paay khechana kadhi banda karnar ahet dev jane!

    ReplyDelete
  2. घरातली गोष्ट घरातच ठेवलेली बरी..

    ReplyDelete